२४ ऑक्टोबर २०२३

सीमोल्लंघन

प्रत्येक व्यक्तीच्या काही सीमा असतात, त्याचे उल्लंघन हा मानवाचा स्वभावच नाही. पण खूप जण असे असतात की ते आपापल्या zone (comfort zone) मध्ये आनंदी असतात मग काय गरज आपल्या त्या झोन च्या बाहेर जाण्याची. 

पण काही लोक असतात ते नेहमी आपल्या ज्ञानाच्या, व्यवहाराच्या कक्षा रुंदवण्याचा नेहमी प्रयत्न करतात.

या एकविसाव्या शतकात आपण आपल्या क्षेत्रात बळकट आणि update असेल तरच आपण टिकून राहू शकतो. 

काळ असा आहे की आपण जर मेकॅनिकल इंजिनिअर पार्श्वभूमी असलेले असाल तर गरजेचे नाही की फक्त आपल्याला तेव्हढंच जमायला हवं. आपल्याला संगणक, माहिती तंत्रज्ञान,  सामान्य ज्ञान, व्यावहारिक गणित,  इतिहास, भूगोल, समाजशास्त्र अशा बऱ्याच क्षेत्रातील माहिती असणे गरजेचे आहे तरच आपण आजच्या महिती तंत्रज्ञाच्या युगात टिकू शकतो. तसच हे इतर क्षेत्रातील लोकांना पण लागू होते. 

इतिहासात आपल्याला आढळते की आजच्याच मुहूर्तावर राजे महाराजे त्यांचे साम्राज्य विस्तारण्यासाठी मोहिमा सुरू करायचे, व्यावसायिक आपला व्यवसाय वाढविण्यासाठी विदेशी मोहीमा राबवायचे. 

मग आपण कुठवर आपल्या सीमेमध्येच अडकून राहणार. आपल्याला पण आपल्या ज्ञानाच्या मोहिमा राबवाव्या लागतील आणि विस्तार करावा लागेल आपल्या बौद्धिक साम्राज्याचा. 

वेळ आहे मित्र-मैत्रिणींनो आपल्या सीमा रुंदवण्याचा म्हणजेच सीमोल्लंघनाची.... तर चला...सीमा ओलांडूया !

मित्रहो...आज विजयादशमी. तुम्ही ज्या कुठल्याही क्षेत्रात असाल...तिथल्या सीमा ओलांडा. प्रगतीची नवनवीन शिखरे गाठा आणि मैत्रीचे...प्रेमाचे सोने वाटा. नव्या गोष्टी करण्यासाठी तुमचा प्रत्येक दिवस मुहूर्ताचा असावा..

०७ ऑक्टोबर २०२३

झुरळ

बदल हा निसर्गाचा नियम
बदलणाऱ्या काळानुसार आपल्याला बदलायला हवे.
येणारी प्रत्येक वेळ ही कठीण असते त्यानुसार आपली सहनशक्ती, विचारशक्ती बदलायला हवी.
अभ्यास करतांना काही गोष्टींचा मनावर विपरीत परिणाम न होता आपल्या पद्धतीने अभ्यास करत राहणे महत्वाचे असते, 
नाही तर मग परीक्षा समोर गेली म्हणून नंतर अभ्यास करणार किंवा अभ्यास करून काय फायदा जर वेळेवर परीक्षाच होत नसेल तर, असे विचारच आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. 
त्यामुळे आता काय निर्णय घेताय त्यावर उद्याचा भविष्यकाळ अवलंबून असतो.
डार्विनचा सिध्दांत आहे ना, Survival of the fittest.
म्हणजे काळानुसार जो स्वतःला बदलून घेणार तोच इथे टिकणार आहे.  
झुरळ महिती आहे का? हो झुरळच (Cockroach) ही अशी किटकाची जात आहे की जे 3000 ते 3500 लाख वर्षांपासून टिकून आहे. 
या कालावधीत महाशक्तिशाली डायनसोर सुद्धा नष्ट झाले कारण की ते निसर्गाप्रमाणे स्वतःला बदलवू शकले नाहीत (वेळ आली तेव्हा धावू शकले नाही). 
अर्थातच म्हणजे झुरळाने स्वतःला काळानुसार बदलून घेतले, नाहीतर जीथे मोठे मोठे प्राणी टिकू शकले नाही तिथे हे लहान कीटक कस काय टिकू शकतो, उत्तर एकच ते म्हणजे 'बदल' किंवा 'अनुकूलता' (Adaption). 
आताचा काळ पण आपल अस्तित्व टिकवण्याचा काळ आहे, यामध्ये आपण स्वतःमध्ये काही बदल न करता टिकू शकत नाही. 
त्यामुळे  ज्याप्रमाणे पाण्याला कोणत्याही भांड्यात टाकले तर तो त्याचा आकार घेतो म्हणजे  स्वतःचे वस्तुमान न बदलता फक्त आकारमान बदलतो .
त्याचप्रमाणे आपल्याला स्वतःला परिस्थितीनुसार बदलावं  लागेल तरच आपण टिकवून राहू शकू,
नाहीतर सर्वात बुद्धीमान समजल्या जाणाऱ्या प्राण्याचा पण या पृथ्वीवरुन नाश होऊ शकतो आणि टिकणार फक्त झुरळ...
इसलीए पानी की तरह बनो,
जो घागर (मटका) को भी अपना करे
और वक्त आए तो सागर (संमुदर) को भी भरे...
Be a Cockroach...
जीवनाचा हा खेळ खुप वेळेपर्यंत चालणार इथे जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नसून इथे फक्त टिकवून राहणे महत्वाचे आहे...

सुखी होण्याचं गुपित

          "द अल्केमिस्ट" या पुस्तकाबाबत स्पर्धा परीक्षेच्या एका डेमो लेक्चर मध्ये ऐकायला मिळाले. म्हटलं वाचूया हे पुस्तक पण आपल्या...